आज उदगीर येथे एका 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू व 12 रुग्णांना रुग्णालयातुन सुट्टी
लातूरासाठी सलग दुसरा दिवस दिलासादायक ठरला आहे. आज लातूर जिल्ह्यातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 7, उपजिल्हा रुग्णालय निलंगा 1 व उपजिल्हा रुग्णालय उदगीर 4 अशा एकूण 12 रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आज बाभळगाव 3, मोतीनगर 1, जुनी कापड लाईन 2 व भुसार लाइन 1 असे 7 रुग्ण तर उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथून 1 तसेच उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील किंनी 3 व नोबेल कॉलनी 1 असे 4 याप्रकारे लातूर जिल्ह्यातून 12 रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयातील ०७ रुग्णांची प्रकृती पुर्ण पणे बरी झाल्यामुळे आज त्यांना सुट्टी करण्यात आली आहे. त्यापैकी एका रुग्णास मधुमेह होता व तो रुग्ण 12 दिवस अतिदक्षता विभागात होता. तीन रुग्णांना गंभीर स्वरुपचा आजार होता. त्यांचे वय 50, 52 व 65 वर्षे होते. तसेच इतर चार रुग्णांना सौम्य स्वरुपाचा आजार होता सदर रुग्ण २२ ते 65 वर्षे वयोगटातील होते त्यात ०५ पुरुष ०२ स्त्री रुगण होते. यात एका गर्भवती महिलेचा समावेश होता व त्यांची प्रकृती पुर्णपणे बरी झाली आहे. या ०७ रुग्णांपैकी लातुर शहरातील 04 रुग्ण व ग्रामीण भागातील 03 रुग्ण आहेत अशी माहिती डॉ. किरण डावळे यांनी दिली. यावेळी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. गिरीष ठाकुर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे उपस्थित होते.
आज नई आबादी , उदगीर येयील 55 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला असून या रुग्णाला डायबिटीज व हायपर टेंशन चा त्रास होता.