हीच ती वेळ ! माणुसकी जपण्याची आपली आपल्या परिवाराची व आपल्या भागाची काळजी घेण्याची
बाहेरून येणारे लोकही आपलेच आहेत, गावात राहणारेही लोक आपलेच आहेत. परंतु मोठ्या शहरातून येणार्ऱ्यांनी थोडी जास्त काळजी घेण्याची गरज आहे. प्रत्येकाने आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे. आपण प्रशासनाला सहकार्य करण्यात कुठेतरी कमी पडत आहोत हे आता लक्षात येत आहे. दिवसेंदिवस कॉरोना बधितांची संख्या वाढतच आहे.
मी लॉकडवून च्या सुरुवातीलाच बोललो होतो की, "मला काही होणार नाही, यापेक्षा माझ्यामुळे कुणाला काही होणार नाही याची दक्षता घेणे अतिशय आवश्यक आहे."हे मी केवळ दुसऱ्यांना उपदेश देण्यासाठी बोललो नव्हतो, आपण आता स्वतःला 'क्वारांटायीन' करून घेतलं पाहिजे मी आजही काळजी घेत आहे