उदगीर कोविड -१९ चा आत्तापर्यंतचा अहवाल सविस्तर वाचा

उदगीर येथील 4 व्यक्तींच्या स्वाब निगेटिव्ह व लवकरच ११ रुग्णांची रुगणालयातुन सुटटी मिळणार तर १६ वर उपचार चालू



लातूर( प्रतिनिधी ):- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 11.05.2020 रोजी सकाळी 8.00 ते दु 4.00 पर्यंत कोरोना (कोविड-19) बाहयरुग्ण विभागात एकुण 42 व्यक्तींची तपासणी करण्यात आली.  यापूर्वीच दिनांक 04.04.2020 रोजी 8 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले होते ते रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना या रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे व एका रुग्णाचा अहवाल प्रलंबित आहे.  
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 26 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 4 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच ४ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  अशी माहिती विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख तथा सहयोगी प्राध्यापक सुक्ष्मजीवशास्त्र विभाग डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.
उदगीर येथील ११ रुग्णांची रुगणालयातुन सुटटी मिळणार     उदगीर येथील कोविड १९ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २७ कोविड रुग्णांपैकी ११ जणांची प्रकृती उत्तम असुन त्यांना रूग्णालयातुन सुटटी देण्यात येत असल्याची माहिती, राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्यमंत्री तथा लातूर जिल्हाचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.
   या संदर्भाने माहिती देताना पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले की, उदगीर शहर वगळता संपूर्ण लातूर जिल्हा सदया कोविड १९ मुक्त आहे. अगदी सुरूवातीच्या काळात परराज्यातील १२ प्रवाशी आध्र प्रदेशात जात असतांना निलंगा येथे आढळून आले होते. त्यांची तपासणी केली असता त्यापैकी ८ कोविड पॉझिटीव्ह असल्याचे निर्दशनास आले त्यांच्यावर लातुर येथील विलासराव देशमुख विज्ञान संस्थेत उपचार करण्यात आले त्यांनंतर त्यांना निलंगा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
            लवकरच त्यांना त्यांच्या आध्रप्रदेशातील मुळगावी पाठविण्यात येणार आहे. दरम्यान संपूर्ण लातुर जिल्हा कोविड मुक्त झाला असतांना उदगीर येथे एका महिलेस कोविड १९ ची लागण झाल्याचे निर्दशनास आले. त्यात त्यांचा मृत्युही झाला. त्यानंतर संबंधित कुटुंब परीरसरातील नागरीकांची तपासणी केली असता आज पर्यत एकूण २७ रुग्ण आढळून आले आहेत. उदगीर येथील कोविड १९ रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. यापैकी ११ जणांची प्रकृती ठणठणीत बरी झाली आहे. त्यांच्यात कोविड १९ ची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे केंदशासनाच्या मार्गदर्शक सुचना प्रमाणे या ११ रुग्णांना रूग्णालयातुन सुटटी देण्यात येणार आहे.
           यापुढील काही दिवस त्यांना त्यांच्या घरी होम क्वॉरनटाईनमध्ये ठेवण्यात येणार आहे , उर्वरित १६ रुग्णांवर यशस्वी उपचार करून त्यांनाही लवकरच सुट्टी देण्यात येईल अशी माहिती पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली आहे.