व्यक्तीतील मीपणा घातकअसुन त्याग महत्वाचा —डाॅ शिवलींग शिवाचार्य महाराज
उदगीर (तालुका प्रतिनिधी)व्याक्तीमधील मिपणा घातक असुन सामाजिक एकता व हम सब एक है ही भावना महत्वाची असल्याचे मत राष्ट्रसंत डाॅ शिवलिंगशिवाचार्य महाराज यांनी महासंकल्प सिद्घी एक लाख स्वक्षरी अभियान उदगीर ते अहमदपूर भक्तीस्थळ दिंडी कार्यक्रमानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते . डाॅ शिवाचार्य म्हणाले समाजातील व व्याक्तीमधील त्यागाची वृती महत्वाची असुन ती वृदींगत होण्यासाठी प्रयत्ना महत्वाचे आहेत .तसेच माझे कांहीही नाही माझ्या शरीरातील प्रत्येक रक्ताचा थेंब भक्तांच्या भक्ती व श्रद्घेचा आहे. .यावेळी व्यासपीठावर जिल्हापरीषद अध्यक्ष राहूल केंद्रे ,नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे ,चंद्रकांत वैजापूरे पंपंचायत समिती सभापती विजयकुमार पाटील , सज्जन लोनाळे ,शिवसेना तालुकाध्यक्ष चंद्रकांत टंगेटोल ,दत्ता खंकरे ,अॅड दत्ता पाटील,नवनाथ गायकवाड , यावेळी शिवलींग शिवाचार्य महाराज यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याच्या मागणीसाठी, जनजागृतीचळवळ , व एकलाख स्वक्षरी मोहीम ,उदगीर जिल्हानिर्मिॅॅतीसाठी करावे या मागणीसाठी उदगीर येथून भक्तीस्थळ अहमदपूर येथे रथ रवाना झाला .